श्रावस्ती (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा (35) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज वर्मा या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मिश्रा या किसान युनियनच्या सभेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याने त्यांच्या पती संतोष मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी सुरज वर्मा याने सांगितले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्याचे आणि आंचल मिश्रा यांचे प्रेमसंबंध होते. आंचल त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती आणि पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत असल्याचा दावा त्याने केला. या भीतीमुळे आणि वादातून त्याने 17 फेब्रुवारी रोजी आंचल यांना जंगलात नेऊन गळा दाबून हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आंचलच्या पतीसोबत तिला शोधण्याचे नाटकही केले. मात्र पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास केला असता त्याचा खोटेपणा उघड झाला.
आरोपीच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी 3 मार्च रोजी ककरदरी जंगलातून आंचल मिश्रा यांचा मृतदेह आणि जळालेले कपडे जप्त केले. घटनास्थळावर मिळालेल्या कपड्यांच्या आधारे पती संतोष मिश्रा यांनी ओळख पटवली.
भिनगा क्षेत्राचे क्षेत्राधिकारी सतीश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून आरोपी सुरज वर्मा याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज…
मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास... या…
मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये…
जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…