क्राईम

प्रेमप्रकरणातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा यांची हत्या; आरोपी अटकेत

श्रावस्ती (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा (35) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज वर्मा या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मिश्रा या किसान युनियनच्या सभेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याने त्यांच्या पती संतोष मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी सुरज वर्मा याने सांगितले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्याचे आणि आंचल मिश्रा यांचे प्रेमसंबंध होते. आंचल त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती आणि पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत असल्याचा दावा त्याने केला. या भीतीमुळे आणि वादातून त्याने 17 फेब्रुवारी रोजी आंचल यांना जंगलात नेऊन गळा दाबून हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आंचलच्या पतीसोबत तिला शोधण्याचे नाटकही केले. मात्र पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास केला असता त्याचा खोटेपणा उघड झाला.

आरोपीच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी 3 मार्च रोजी ककरदरी जंगलातून आंचल मिश्रा यांचा मृतदेह आणि जळालेले कपडे जप्त केले. घटनास्थळावर मिळालेल्या कपड्यांच्या आधारे पती संतोष मिश्रा यांनी ओळख पटवली.

भिनगा क्षेत्राचे क्षेत्राधिकारी सतीश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून आरोपी सुरज वर्मा याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

28 मिनिटे ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

36 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

43 मिनिटे ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

48 मिनिटे ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

6 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

6 तास ago