मुंबई: बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कसा झाला अपघात
दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोरुन जात असताना बेस्ट इलेक्ट्रिक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला बसने मागच्या बाजूने धडक दिली.
यावेळी कार आणि बस यांच्या मधोमध असलेली महिला चिरडली गेली. तिच्या शरीराच्या खालील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.
संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. मात्र तिच्यावर काळाने घाला घातला. महिलेला अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.
खेडमध्ये महिला भाविकांनना अपघात
तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन घाटातून जाणारी गाडी तब्बल 80 फूट खोल दरीत कोसळल्याने दहा महिलांचा मृत्यू झाला, तर 25 ते 30 जणी जखमी झाल्या आहेत.
खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या शिव कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी पापळवाडी येथील काही महिला पीकअप जीपने जात होत्या. घाटातून प्रवास करताना त्यांची गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात घेऊन जाताना आणखी एका महिलेने प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सिल्लोड- भोकरदन रस्त्यावरील वरुड पिंप्री फाट्यावर घडला. पंकज उर्फ पोपट कौतिक शिरसाट (२६, रा. पिंप्री) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…