क्राईम

इलेक्ट्रिक बस कारवर आदळल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून अंत

मुंबई: बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा झाला अपघात

दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोरुन जात असताना बेस्ट इलेक्ट्रिक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला बसने मागच्या बाजूने धडक दिली.

यावेळी कार आणि बस यांच्या मधोमध असलेली महिला चिरडली गेली. तिच्या शरीराच्या खालील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.

संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. मात्र तिच्यावर काळाने घाला घातला. महिलेला अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

खेडमध्ये महिला भाविकांनना अपघात

तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन घाटातून जाणारी गाडी तब्बल 80 फूट खोल दरीत कोसळल्याने दहा महिलांचा मृत्यू झाला, तर 25 ते 30 जणी जखमी झाल्या आहेत.

खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या शिव कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी पापळवाडी येथील काही महिला पीकअप जीपने जात होत्या. घाटातून प्रवास करताना त्यांची गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात घेऊन जाताना आणखी एका महिलेने प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सिल्लोड- भोकरदन रस्त्यावरील वरुड पिंप्री फाट्यावर घडला. पंकज उर्फ पोपट कौतिक शिरसाट (२६, रा. पिंप्री) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

13 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

13 तास ago