मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतत असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला सोमवारी रात्री अंधेरी–जुहू परिसरात भीषण अपघात झाला. जुहूतील सिल्व्हर बीच कॅफेसमोर भरधाव वेगाने धावणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पूर्णपणे चुरगळली गेली असून मर्सिडीज कार पलटी होऊन थेट रिक्षावर कोसळली.
अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना हे सोमवारी संध्याकाळी विमानतळावरून थेट घरी निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील वाहनाने रिक्षाला धडक दिल्यानंतर अपघाताचे भीषण दृश्य निर्माण झाले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात रिक्षामध्ये चालक व प्रवासी अडकलेले स्पष्टपणे दिसत आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अक्षय कुमार स्वतः गाडीतून बाहेर उतरून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. मात्र, काही वेळानंतर अक्षय कुमार व त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या वाहनाने पुढील प्रवासासाठी निघून गेल्याची माहिती आहे.
या अपघातात रिक्षाचालक बसित खान गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या ते मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघातात इतर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिक्षामधील प्रवाशांच्या प्रकृतीबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, जुहू पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ तपास सुरू केला आहे. अपघातग्रस्त मर्सिडीज कार जप्त करण्यात आली असून प्राथमिक तपासात भरधाव वेग आणि बेफाम वाहनचालना हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. रिक्षाला धडक दिल्यानंतर ती पुन्हा मर्सिडीजवर आदळल्याने कार पलटी झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…