मनोरंजन

‘मुरांबा’मध्ये मोठा ट्विस्ट! रमा-अक्षय अखेर एकत्र; प्रोमो पाहून चाहत्यांचा जल्लोष

मुंबई: पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. त्यातील कलाकारही घरातीलच सदस्य असल्यासारखे वाटतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगलं घडावं, अशीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. मात्र कथानक रंजक ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच एक मोठा ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे.

‘मुरांबा’ ही मालिका आणि त्यातील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांच्या नात्यात अनेक चढ-उतार दाखवण्यात आले. मालिकेने लीप घेतल्यानंतर रमाचा अपघात, तिच्या जागी माहीची एंट्री आणि इरावतीने मुद्दाम दोघांना दूर ठेवण्याचा प्रयत्न—या सगळ्या घडामोडींमुळे कथानकाला वेगळी कलाटणी मिळाली होती.

सध्या मालिकेत साई आणि रमाचं लग्न होणार असल्याचं चित्र रंगवलं जात होतं. मात्र ऐनवेळी कथानकाने नाट्यमय वळण घेतलं आहे. रमा थेट लग्नाच्या मंडपातून अक्षयसमोर येते आणि दोघांच्या प्रेमाला पुन्हा नवा अध्याय मिळतो. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये रमा ट्राफिक जाम करत गाडीच्या टपावर चढून अक्षयला हाक मारताना दिसते. हा सीन पाहून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

सोशल मीडियावर या प्रोमोला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एका चाहत्याने लिहिलं, “खूप खूप सुंदर प्रोमो दाखवला आहे.” तर दुसऱ्याने ‘जा सिमरन जा…’चा संदर्भ देत, “जा रमा जा, तुझ्या अक्षयकडे,” अशी प्रतिक्रिया दिली. १४ फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर प्रेमी युगुल एकत्र येणार याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला आहे. “ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाच,” अशीही एक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. तर काहींनी, “शेवटी रमा-अक्षय एकत्र दाखवलं, काय ते कंटाळवाणं चालू होतं,” असे म्हणत समाधान व्यक्त केले.एकूणच, ‘मुरांबा’ मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरली असून, पुढील भागांमध्ये रमा-अक्षयच्या नात्याची नवी सुरुवात कशी रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

14 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

23 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

23 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago