मनोरंजन

वाघ्या–मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’ १७ एप्रिलपासून प्रदर्शित

मुंबई: मराठी मातीतल्या पारंपरिक वाघ्या–मुरळी लोकपरंपरेवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेतील स्त्री कलाकारांचा संघर्ष, वेदना आणि जिद्द मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. यावेळी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘फुला’ १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची निर्मिती पै. अजित शिवाजी जाधव यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा प्रस्तुत हा चित्रपट दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी दिग्दर्शित केला आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांची असून संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे. छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे आणि संकलन राहुल प्रजापती यांनी सांभाळले आहे.चित्रपटातील गाणी वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत यांसह अनेक गायकांनी साकारली आहेत.

काय आहे कथानक?

‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची भावस्पर्शी आणि संघर्षमय कहाणी आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या लोकपरंपरांच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा समाजातील वास्तव प्रश्नांवर भाष्य करते. दिग्दर्शक अभिषेक जावीर यांच्या मते, हा चित्रपट केवळ एका मुलीची कथा नसून लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा जिवंत दस्तावेज आहे.

आटपाडी गावातील टीमने साकारलेला हा पहिलाच चित्रपट असल्याने ‘फुला’कडून प्रेक्षकांना वास्तववादी आणि अस्सल मराठी अनुभवाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

2 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

3 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

3 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

3 तास ago

शरीरात हे ५ संकेत दिसणं म्हणजे नक्कीच काहीतरी तंत्र बिघडलंय, दुर्लक्ष कराल तर होईल मोठं नुकसान

तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…

3 तास ago

कॉलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ; चांगल्या तब्येतीसाठी आजपासूनच खाणं सोडा

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच…

3 तास ago