मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये दर आठवड्याला नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सहाव्या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची चर्चा रंगली असतानाच ‘भाऊच्या धक्क्यावर’ मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. खान्देशचा किंग म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत याचे एलिमिनेशन झाले आहे.
सचिनने घरात सहा आठवड्यांहून अधिक काळ प्रामाणिकपणे खेळ करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कोणताही वाद न घालत, शांत आणि संयमी स्वभावामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र कमी मतांमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
घराबाहेर आल्यानंतर सचिन कुमावतने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, “बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खानदेशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खास होता. ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ कोणाचाही द्वेष न करता प्रामाणिकपणे खेळू शकलो, याचा अभिमान आहे. या प्रवासात दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद.”
तसेच महाराष्ट्राने दिलेल्या अपार प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. लवकरच पुन्हा भेटू,” असेही त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
‘बिग बॉस मराठी’मुळे सचिन कुमावत खान्देशात घरोघरी पोहोचला. त्याची ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ आणि ‘सचिनच रस प्यायला ये म्हणलं माय’ ही गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.
आता घराबाहेर पडल्यानंतर सचिन कुमावत कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…