मनोरंजन

गायक KK ने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी केलं होतं ‘हे’ काम

मुंबई: आपल्या जीवनाचा काही भरवसा नसतो कधी कोण आपल्यामधून एक्झिट घेईल काही सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात आपल्यामधून प्रसिद्ध गायक KK ने अचानक एक्झिट घेतली. तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. ज्यांनी आपल्या गायनालाच आपला धर्म मानला. आणि आपल्या गायनानेच रसिकांचं भरभरुन प्रेम मिळवलं.

तुम्ही जर ९० च्या दशकातील पॉप गाणी ऐकत असाल तर तुम्ही KK चे ‘यारों.. दोस्ती.. बडी ही हसीन है’ ऐकलेच असेल. या गाण्याने त्या काळातील तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. KK तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले होते. KK अशा मोजक्या गायकांपैकी होते. ज्यांनी गायनासाठी अक्ख आयुष्य पणाला लावलं. त्यांचा शेवटही एक गाण्याची कॉन्सर्ट दरम्यान झाला. केकेच्या आयुष्याविषयी कोणाला जास्त कल्पना नाही.

KK ने 1991 मध्येच त्याची गर्लफ्रेंड ज्योती कृष्णासोबत लग्न केले. KK ची प्रेमकहाणी इयत्ता 6 व्या वर्गात सुरु झाली. KK कॉमेडियन-होस्ट कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’ मधील गायक डॉ. पलाश सेन आणि शान यांच्यासोबत दिसला होता. या शो दरम्यान KK ने त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले होते की, ज्योतीशी लग्न करण्यासाठी त्याला सेल्सची नोकरी करावी लागली, कारण सासरच्या मंडळींना आपल्या मुलीचे लग्न एका बेरोजगार मुलासोबत करायचे नव्हते. केकेने सांगितले की मी ते विक्रीचे काम तीन महिने केले आणि नंतर सोडून दिले. तसेच बायक आणि वडिलांच्या पाठिंब्याने केके गायक बनू शकले.

KK ने 1991 मध्ये त्याची प्रेमिका ज्योती कृष्णाशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना २ मुले झाली. १ मुलगा आणि १ मुलगी. त्यांच्या मुलाचे नाव नकुल कृष्ण कुननाथ आणि मुलीचे नाव तमारा कुननाथ आहे. नकुल देखील केके सारखा प्रतिभावान आहे आणि त्याने 2008 मध्ये वडिलांच्या ‘हमसफर’ अल्बममध्ये ‘मस्ती’ गाणे गायले होते. जोपर्यंत तमाराचा संबंध आहे, ती एक प्रशिक्षित पियानो वादक आहे. मात्र, या दोघांच्या कारकिर्दीबाबत अधिकृत माहिती नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

14 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

23 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

23 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago