मुंबई: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे यांची आई आजारीपणामुळे निधन झाली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ या मालिकांमधून झळकलेली भाग्यश्रीने या दु:खद घटनेची माहिती स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत आईशी शेवटचा संवाद व्यक्त केला आहे. “आई, आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण झाले आहेत; पण तू मला एकही फोन केला नाही. तू म्हणालीस, ‘तुझ्यासाठी लग्न कर आणि मागे वळून बघू नकोस.’ आता तू गेल्यावर मला कळलं की तू माझ्यासाठी निवडलेला मुलगा आणि घर किती योग्य आहे,” अशा शब्दांत तिने आपले दुःख व्यक्त केले.
अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, “तुझ्यासाठी मी लग्न केलं; पण तू फक्त माझं लग्न पाहिलं. माझा संसार पाहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. आता मला कोण राणा म्हणेल… आई, मी मागे वळून बघणार नाही, हे तुला माझं वचन आहे.”
भाग्यश्रीच्या आईचा आजार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, मात्र गेल्या आठवड्यात तिच्या प्रकृतीत अचानक बिकट घसरण झाली. ही बातमी कळताच भाग्यश्री मुंबईहून तातडीने पुण्याला गेली होती. त्यांच्या आईच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून कलाकार आणि चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…