मुख्य बातम्या

कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

कान्हूर मेसाई गावात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाई निर्माण झाली असून, विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलचे पाणी आटणे, तसेच उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा ठरणे, या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला असून,या बैठकीत पाणीपुरवठ्याचे कायमस्वरुपी नियोजन, सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देणे, जलस्रोतांचे बळकटीकरण, तसेच तातडीच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

कान्हूर मेसाई येथील शेतकरी या बैठकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, केवळ आश्वासनांपुरते न राहता ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची मागणी केली जाणार आहे. विशेषतः उन्हाळ्यात वाढणारी पाणीटंचाई लक्षात घेता तातडीने उपाययोजना जाहीर व्हाव्यात, अशी शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीस उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दर्शवली असून, समस्या समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्याची बैठक केवळ चर्चेपुरती न राहता कान्हूर मेसाईच्या पाणीप्रश्नावर निर्णायक ठरणार का…? याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आमदार राहुल कुल , जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून शेखर पाटील पाचुंदकर यांनी ही बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा सतीश पाचंगे याही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago