शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगाम असूनही जुलै महिन्याच्या मध्यावर पाऊस न पडल्याने तालुक्यात अगदीच नगण्य पेरण्या झालेल्या आहेत. तालुक्याच्या काही भागात पावसाचे आगमन झाले असून खरीपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे असताना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शासनाने जाहीर केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेतून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल. टाकळी हाजी परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी बाजरी, भुईमूग, मूग ,उडीद, तुर अशा पिकांचा विमा उतरवून या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी पर्यवेक्षक अंकुश परांडे व कृषी सहायक टी बी समरीत यांनी केले आहे.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…