शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगाम असूनही जुलै महिन्याच्या मध्यावर पाऊस न पडल्याने तालुक्यात अगदीच नगण्य पेरण्या झालेल्या आहेत. तालुक्याच्या काही भागात पावसाचे आगमन झाले असून खरीपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे असताना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शासनाने जाहीर केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेतून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल. टाकळी हाजी परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी बाजरी, भुईमूग, मूग ,उडीद, तुर अशा पिकांचा विमा उतरवून या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी पर्यवेक्षक अंकुश परांडे व कृषी सहायक टी बी समरीत यांनी केले आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…