शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगाम असूनही जुलै महिन्याच्या मध्यावर पाऊस न पडल्याने तालुक्यात अगदीच नगण्य पेरण्या झालेल्या आहेत. तालुक्याच्या काही भागात पावसाचे आगमन झाले असून खरीपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे असताना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शासनाने जाहीर केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेतून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल. टाकळी हाजी परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी बाजरी, भुईमूग, मूग ,उडीद, तुर अशा पिकांचा विमा उतरवून या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी पर्यवेक्षक अंकुश परांडे व कृषी सहायक टी बी समरीत यांनी केले आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …