मुख्य बातम्या

उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; १७ हजारांचा मुद्देमाल लंपास

न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने दोन पाण्याच्या मोटारी आणि तांब्याची केबल असा सुमारे १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामदास लहानू काळे (वय ७१,रा. उरळगाव, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांच्या शेतातील बोअरमधील लक्ष्मी कंपनीची ५ एचपी क्षमतेची मोटार व २५० फूट तांब्याची तार असलेली केबल, तसेच त्यांचे बंधू बाळासाहेब काळे यांच्या शेतातील बोअरमधील लक्ष्मी कंपनीची ३ एचपी क्षमतेची मोटार व २५० फूट तांब्याची तार असलेली केबल अज्ञात चोरट्याने लंपास केली.

हि चोरी १२ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट च्या दरम्याच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शेतातील बोअरवेलवर लावलेल्या मोटारी व केबल गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर काळे यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत. शेतातील बोअरवेलवरील मोटारी, केबल तसेच शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील हालचालींची माहिती घेतली जात असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे.…

3 मिनिटे ago

शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? राऊतांचा फडणवीसांना इशारा; मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट ते सपकाळांची टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय…

12 मिनिटे ago

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला…

16 मिनिटे ago

सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…

7 तास ago

२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर होणार; ‘आधी मोजणी, मग रजिस्ट्री’ची नवी व्यवस्था

मुंबई : जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट आणि ताबा असतानाही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या राज्यातील…

7 तास ago

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे…

7 तास ago