शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. परंतु पराभवाने खचुन न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असुन नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असुन आढळराव पाटील यांनी परत शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी आज (दि २८) रोजी लांडेवाडी येथे केली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची शिरुरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना त्यांची हि भुमिका रुचली नाही. त्यामुळे मतदारांनी आढळराव यांना नाकारले आणि कोल्हे यांना निवडुन दिले. परंतु आढळराव यांनी पुन्हा शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली असुन आढळराव हे पुन्हा शिवसेनेत आल्यास पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढेल असे मत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, शिरुर-आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारी काळे, शिरुरचे तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, हवेलीचे तालुकाप्रमुख विपुल शितोळे, खेडचे तालुकाप्रमुख राजेंद्र जवळकर, जिल्हा परिषदचे गटनेते देविदास दरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, शरद नवले, शिरुर युवासेना प्रमुख विष्णु वाळके, तालुका संघटक दत्ता गिलबिले, युवा कार्यकर्ते वैभव ढोकले, आण्णा हजारे आदी कार्यकर्त्यांनी हि आग्रही मागणी केली आहे.
शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?
शिरुर तालुका भुमिअभिलेख तर्फे गावनिहाय शासकिय सनद वाटप होणार; उपअधीक्षक अमोल भोसले
शिरुर तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…
नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…
मुंबई: देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्यासाठी…
नागपूर: ईम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक लोकसंख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची…
नाशिक: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मूळ मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, या मागणीसाठी क्रांती…