शिक्रापूर ग्रामस्थ व सासवडे कुटुंबीयांनी काढली पुजाची मिरवणूक
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पूजा प्रथमेश सासवडे हिची यापूर्वी २०२१ महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी बनून देखील नंतर जिद्द कायम ठेवत आय पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली असल्याने पूजा मुळे शिक्रापूरच्या सासवडे सह रांजणगावच्या पवार घराण्याचे नाव उज्वल झाले आहे.
पूजाचा जन्म रांजणगाव येथील पवार कुटुंबियात झाला. वडील विठ्ठल पवार यांनी शेती सांभाळून आपल्या मुलांना शिक्षक दिले, शिक्षणात पूजा हुशार मात्र अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते, शिक्षणानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. दीड वर्षापूर्वी तिचा विवाह शिक्रापूर येथील माजी सैनिक असलेली जालिंदर सासवडे यांचा मुलगा प्रथमेश सोबत झाला. मात्र लग्नानंतर पतीसह सासरच्या मंडळींकडून तिला शिक्षणाला साथ मिळाली.
पुजाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत यापूर्वी मंत्रालय कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातलेली असताना पुन्हा तयारी करत परीक्षा देऊन आता नव्याने पोलीस उपअधीक्षक पदावर मजल मारली आहे. पूजाच्या यशाबद्दल शिक्रापूर सह रांजणगाव चे नाव उज्वल झाले असल्याने नुकतीच शिक्रापूर गावातून पुजाची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पूजाच्या आई वडिलांसह सासू, सासरे तसेच पती यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिक्रापूर सह रांजणगाव गणपतीचे ग्रामस्थ व आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझे लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे मी शिक्षणा नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर भर दिली. प्रथम मंत्रालय कक्ष अधिकारी झाले आता पोलीस उपअधीक्षक झाले असून मला माझ्या आई वडिलांसह पती व सासू सासऱ्यांची मोठी साथ मिळाली यापुढे पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे पूजा पवार- सासवडे यांनी सांगितले.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…