शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथील माती उपसा प्रकरण सध्या तालुव्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात शेतजमिनीतील माती गावातील लोकांनी चोरून नेल्याचा आरोप करत अॅड. फडके यांनी थेट तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तहसिलदारांनी मंडल आधिकारी, तलाठी यांना पंचनामा कराण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.व त्यानंतर अँड फडके यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे माती उपसा केल्या प्रकरणी गावातील चार व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा गैरवापर करत काही शिदोंडीच्या बड्या राजकीय नेत्यांनी गावातील राजकीय आकसापोटी खोट्या माहितीच्या आधारे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना निवेदन सादर करत तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
तहसिलदार म्हस्के यांची कारकीर्द ठळक कामगिरीने उजळलेली असून बाळासाहेब म्हस्के यांनी शिरूर तहसिलदार पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर तालुक्यात प्रशासनाच्या कामकाजाला नवे बळ मिळाले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत तब्बल अंदाजे २०० हून अधिक शिव व पानंद रस्ते खुल्या करून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग मोकळा केला आहे.
यासोबतच, १५५ ची चुक दुरुस्ती, रस्ता व पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी यासारख्या अनेक प्रलंबित प्रशासकीय विषयांवर त्यांनी तातडीने कारवाई करून न्याय दिला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून रखडलेल्या फाईली मार्गी लागल्या असून शेतकरी, ग्रामीण जनता आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे खुलेआम कौतुक केले आहे.
तहसिलदार म्हस्के हे नियम, प्रामाणिकपणा व पारदर्शक कारभाराचे उदाहरण ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे केवळ व्यक्तिगत व राजकीय फायद्यासाठी प्रेरित असून तथ्यहीन असल्याचे मत रस्ता चळवळीचे प्रणेते शांताराम पानमंद, सामाजिक कार्यकर्ते शरद उघडे,अल्ताफ तांबोळी, मनसेचे अविनाश घोगरे यांनी व्यक्त केले आहे.
एकीकडे प्रशासनातील पारदर्शकता व गतिमान कामासाठी ओळख निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशी बदनामीकारक मोहीम राबवणे अत्यंत दुर्दैवी आहे. योग्य चौकशी झालीच पाहिजे, मात्र ती सत्य व न्यायाच्या आधारावर झाली पाहिजे, असा सूर सध्या शिरूर तालुक्यात उमटत आहे. यापुर्वी तहसिल कार्यालयाला पुर्णवेळ तहसिलदार मिळत नव्हते.त्यामुळे त्या काळापासून नागरीकांची बरीचशी कामे रखडली होती. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी शिरूर तहसिल दार पदाचा चार्ज घेतल्यानंतर प्रलंबित कामासह अनेक कामे तातडीने मार्गी लावले आहेत.
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…