महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो! आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही

नवा निर्णयामुळे २० ते २५ दिवसांत सातबाऱ्यावर होणार दस्त नोंद

संभाजीनगर: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे, जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत तुमच्या सात-बारा उताऱ्यावर दस्त नोंदणी होणार आहे.

डिजिटल क्रांतीमुळे प्रक्रिया झाली सोपी आणि वेगवान

यासाठी आय सरिता आणि ‘ई-फेरफार’ या दोन संगणकीय प्रणालींना एकमेकांशी जोडण्यात आले आहे. यामुळे जमीन व्यवहाराची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक झाली आहे, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. यापुढे तलाठी कार्यालयातील हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे.

कसा होणार दस्त नोंदणीचा प्रवास

आतापर्यंत सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी २-३ महिने किंवा कधीकधी वर्षभरही लागत असे. पण आता ही प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे:

दस्त नोंदणी होताच, सर्व माहिती डिजिटल पद्धतीने थेट महसूल विभागाच्या ‘ई-फेरफार’ प्रणालीकडे जाईल. यात जमीन विक्रेता, खरेदीदार, क्षेत्रफळ, व्यवहाराची तारीख आणि बाजारमूल्य यांसारखी सर्व माहिती स्पष्टपणे उपलब्ध असेल. त्यानंतर तलाठी संबंधित पक्षकारांना नोटीस पाठवतील. मंडल अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर, तुमच्या सात-बारा उताऱ्यावर नावाची नोंद तातडीने केली जाईल.

शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी फायदा या योजनेत फक्त ग्रामीण भागातील सात-बारा उताऱ्यांसाठीच नाही, तर शहरी भागातील मिळकत पत्रिकांसाठीही सुधारणा करण्यात आली आहे. शहरी मिळकत पत्रिकांवरील फेरफार नोंदीसाठी ‘ई-पीसीआयस्त्री’ ही तिसरी संगणकीय प्रणाली जोडण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील जमीन आणि मिळकत व्यवहारांच्या नोंदी डिजिटल पद्धतीने एकत्रित झाल्या आहेत.

भ्रष्टाचार थांबणार, विश्वास वाढणार

महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने एकत्र येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. यामुळे जमीन व्यवहारातील अनावश्यक अडथळे, विलंब आणि भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. सरकारचा हा निर्णय केवळ वेळेची बचत करत नाही, तर पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवून सामान्य माणसाचा प्रशासनावरील विश्वास वाढवेल अशी अपेक्षा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

4 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

4 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

7 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

10 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

10 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

10 तास ago