शिरुर (अरुणकुमार मोटे) घरकुल न बांधता परस्पर बिले काढून लाटल्याचा धक्कादायक प्रकार जांबुत येथे घडला असुन चौकशी करुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. जांबुत (ता.शिरुर) येथील मागासवर्गीय महिला उषा रमेश रणदिवे यांना इंदिरा आवास योजना सन २००३ मध्ये घरकुल लाभ मिळाला होता. पण लाभधारक उषा रमेश रणदिवे यांना त्याची कल्पनाच नव्हती, प्रत्यक्षात त्यांना घरकुलाचा लाभ मिळालाच नाही.वीस वर्षानंतर लाभार्थी बेघर असल्याने घरकुलाचा लाभ मिळावा. या अपेक्षेने जांबुत ग्रामपंचायतकडे घरकूलाची मागणी केली होती.
त्यावेळी लक्षात आले की रणदिवे यांच्या नावे आधीच कोणीतरी घरकूल घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी तक्रारी, अर्ज करून अधिकाऱ्यांना विनवणी केली. परंतु अधिकारी या बाबत जाणिवपुर्वक दखल घेत नसल्याने ‘कोणी घर देता का घर, घरकुल दाखवा बक्षिस मिळवा’ अशी परिस्थिती रणदिवे कुटुंबीयांवर ओढवली आहे.
याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी चौकशी समिती स्थापन केली असुन चौकशी समितीने अहवालही सादर केला. या अहवालातील अभिप्रायानुसार सदर लाभार्थी उषा रमेश रणदिवे यांना ग्रामसभा ठरावाने इंदिरा आवास योजनेमधुन लाभ देणे कामी मंजुरी देण्यात आली होती. ग्रामपंचायत दप्तरी लाभार्थीचे घरकुल पूर्ण झाल्याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थीचे अनुदान नक्की कुठे गेले…? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना नमुना नं ५ वरुन रक्कम रुपये २८, ३१५/- अदा केल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सदर प्रकरणी सादर केलेल्या अहवालानुसार सदरील रेकॉर्ड २० वर्षापुर्वीचे असल्यामुळे संबधित रेकॉर्ड नाशपात्र असून ते रेकॉर्ड मुख्य कचेरी मार्फत पंपिंग केले असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे घरकुल निधी संबधित लाभार्थीच्या खात्यावर जमा झाला किंवा कसे याबाबत कागदपत्रां अभावी खात्री करता आली नाही.
परंतु पुर्ण झालेल्या घरकुलाची नोंद जांबूत ग्रामपंचायत दप्तरी नं.न.८ इमारती व जमीनीची नोंदवहीला नोंदविणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन ग्रामसेवकांनी घरकुलाची नोंद का केली नाही…? अहवालानुसार नोंद झालेली नसल्याचे दिसुन येत असल्यामुळे लाभार्थीस योजनेचा लाभ कोणाला मिळाला…? घरकुलाचे पैसे कोणी लाटले…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषी व्यक्तीवर अर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल, शासनाची फसवणुक, पदाचा गैरवापर, निधीचा अपहार आणि अभिलेखात हेरफेर करुन भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मीचे दर्शन’ झाले की काय…? अशीही दबक्या चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
शिरुर; डिंग्रजवाडी येथील ITW कंपनी जवळ पार्किंग भिंत कोसळली, दोन जण ठार, तर तीन जखमी
कवठे येमाईत पुन्हा एकदा चोरी पावणे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…