शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात जावे लागते. शहरात राहण्याचा तसेच परीक्षांच्या तयारीचा खर्च खुप मोठा असतो. प्रत्येक पालकाला हा खर्च झेपावत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून कवठे येमाई येथील युवक सुरेश गायकवाड याने ओळखून ह्या सुविधा अतिशय मोफत दरात देण्याचे ठरवले आहे. कवठे येमाई व परीसरातील मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याची विनंती कवठे येमाईचे माजी सरपंच दिपक रत्नपारखी यांनी केली आहे.
बेट भागात कवठे येमाई येथे स्वयंभु कॉम्प्युटर्स या नावाने सुरेश गायकवाड या युवकाचे महा-ई-सेवा केंद्र व CSC सेंटर सुरु आहे. ग्रामीण भागात गेल्या ९ वर्षांपासून कवठे व परिसरातील सर्व गावांना प्रामाणिकपणे सर्व सेवा पुरवण्याचे काम तो करत आहे. गावातील मुलांना शिकण्याची इच्छा असते. परंतु त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी मुलांना शहरात जावे लागते. तेथे येणारा खर्च हा अफाट असल्यामुळे अनेकांना हे शिक्षण घेणे शक्य होत नाही. तसेच जे पालक हा खर्च करतात त्यांना चांगल्या दर्जाचे क्लासेस मिळेलच याची शाश्वती नाही.
यामुळे आपल्या ग्रामीण भागातील मुले हि या प्रवेश परीक्षांना कमी पडताना दिसत आहेत. जर या मुलांची प्रवेश परीक्षेची चांगली तयारी करून घेतली गेली तर हि मुले भविष्यात चांगले करिअर करू शकतील. हीच प्राथमिक गरज ओळखून त्यांनी ई-लर्निंग सुविधा स्वयंभु क्लासेस या नावाने कवठे गावात सुरु करण्याचे ठरवले आहे. याद्वारे प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि १ ली ते १२ वी इ. चे क्लास ची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी ई-लर्निंग मध्ये अग्रगण्य असणाऱ्या EMBIBE (by Reliance Industries Ltd.) आणि kompkin या दोन कंपन्याशी करार करून या उच्च गुणवत्ता असलेल्या सुविधा आपल्या कवठे व कवठे परीसरातील मुलांना अगदी माफक फी मध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…