मुख्य बातम्या

उच्च न्यायालयाची खातेदाराच्या कर्ज खात्यात अफरातफर केल्याप्रकरणी महानगर बँकेला समज

शिरुर (तेजस फडके): आपल्या देशात न्यायालयात अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. त्याची वेगवेगळी कारणे पण आहेत. परंतु “न्यायालय मे देर है, लेकिन अंधेर नहीं” असाच एक अनुभव शिरुर तालुक्यातील उद्योजक बाबासाहेब जासूद यांना आलेला आहे. जासुद यांच्या कर्ज खात्यात अफरातफर केल्याबाबत एका बँकेचा अध्यक्ष, व्यवस्थापक आणि इतर काही संबंधित व्यक्तींवर भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. परंतु त्याचा राग मनात धरून बँकेने राजकीय ताकतीच्या जोरावर रातोरात बाबासाहेब जासूद यांच्यावरचं उलट गुन्हा दाखल केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिला आणि त्यानंतर दिनांक ६ मे २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा तोच जामीन कायम केलेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सन २०१५ ते सन २०१७ मध्ये, जी एस महानगर कॉ ऑप बँक शाखा, भोसरी या बँकेने खातेदार बाबासाहेब जासुद यांच्या कर्ज खात्यामध्ये पैशांची अफरातफर केल्याने बाबासाहेब जासूद यांनी ऑगस्ट 2020 मध्ये भोसरी येथील जी एस महानगर कॉ ऑप बँक शाखेचे मॅनेजर अभिजीत कस्तुरे, कुमार मुरलीधर नरवडे, बँकेचे चेअरमन व इतर संबंधित व्यक्तींवर भोसरी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

त्याचाच राग मनात धरून जी एस महानगर कॉ ऑप बँकेने राजकीय ताकतीच्या बळावर रातोरात बाबासाहेब जासूद यांच्यावरच फसवणूकीचा उलट गुन्हा दाखल केला. त्यावेळी जासूद यांनी न्यायालयात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयात वकिलांमार्फत आपली बाजु मांडली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजुर केला. त्यानंतर दिनांक ६ मे २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन कायम करत बँकेला समज दिली आहे. बाबासाहेब जासूद यांच्या वतीने त्यांचे वकील विरेश पूरवंत, नरेंद्र शर्मा, रचित खांपारीया यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यामुळे “शेवटी सत्याचाच विजय होतो” असे बाबासाहेब जासूद यांनी शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

1 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

1 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago