शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तडीपार असलेल्या गुन्हेगाराने उघडपणे दादागिरी करत “मी इथला भाई आहे” असे म्हणत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मिक्सर वाहन चालकाला अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून घेत गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार गुंडावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक शिरूर संदेश केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष तुकाराम वाखारे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाखारे यांनी सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मटेरियल टाकण्यासाठी मिक्सर वाहन पाठविले होते.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेला अभिषेक उर्फ घ्या हनुमंत मिसाळ (वय २४, रा. सोनारआळी, शिरूर) घटनास्थळी आला. त्याने मिक्सर वाहन अडवून चालक अमोल भोर याला दमदाटी केली. वाहनाच्या चाव्या काढून घेत “हे काम चालू ठेवायचं असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर काम बंद होईल आणि हातपाय मोडून गोळ्या घालीन” अशी भीषण धमकी दिली.
इतक्यावर न थांबता आरोपीने चालकाच्या खिशातील ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. “आजचं काम सुरू ठेवा, उद्यापासून काम करायचं असेल तर दोन लाख रुपये द्या” असे म्हणत आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तक्रार दाखल होताच शिरूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अभिषेक उर्फ घ्या मिसाळ याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करत आहेत.शिरूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…