मुख्य बातम्या

‘रांजणगाव’ मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तीन विरोधकांनी एकत्र येत ग्रामपंचायतवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. रांजणगावातील प्रस्थापित पुढऱ्यांच्या विरोधात तरुणाईने दंड थोपटले आणि विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे रांजणगाव मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा सुरु आहे.

रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तीन पारंपरिक विरोधकांनी एकत्र येत सत्तेसाठी मोट बांधली होती. त्यामुळे त्याची भल्याभल्यांनी धास्ती घेतली. परंतु विरोधकांनीही एकत्र येत सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. त्यात विरोधी पॅनलचे राहुल पवार, अर्चना शिंदे हे विजयी झाले. तर एक अपक्ष उमेदवार निवडुन आला. त्यानंतर रांजणगाव मध्ये पुणे-नगर रस्त्यावर दोन वेगवेगळे बॅनर लावण्यात आले. त्या बॅनरच्या मजकूरामुळे रांजणगाव मध्ये सगळीकडे सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा रंगली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सगळीकडे बॅनरच्या मजकुराचीच चर्चा…

रांजणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर पुणे-नगर रस्त्याच्या कडेला दोन वेगवेगळे बॅनर लावण्यात आले. त्यात एका बॅनरवर शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्चना शिंदे यांचा फोटो टाकत “आख्खा गाव नडला, पण वाघ नाय पडला” असा मजकुर छापण्यात आला. तर दुसऱ्या बॅनर वर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे बापुसाहेब शिंदे यांचा फोटो टाकत “ज्यांच्यासाठी युती केली, तेच नाही पडले” असा मजकुर छापण्यात आला असल्याने सगळ्या गावात याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

‘तो’ नेता नडला पण फरक नाय पडला…

रांजणगाव गणपतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत  सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांचा कट्टर समर्थक असलेल्या गावातील एका राजकीय नेत्याने प्रशासनावर दबाव टाकुन राहुल पवार यांना अडचणीत आणण्यासाठी तडीपार करण्याचा प्रयत्न केला. परंतु बापुसाहेब शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधत खरी वस्तुस्थिती समोर आणल्याने राहुल पवार यांना दिलासा मिळाला. या सगळ्या राजकीय घडामोडींचा परिणाम थेट मतदानावर झाल्याने राहुल पवार आणि बापुसाहेब शिंदे यांच्या पत्नी अर्चना शिंदे यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिल्याने ‘तो’ राजकीय नेता तोंडावर पडल्याची सगळीकडे चर्चा चालु आहे. त्यामुळेच “ज्यांच्यासाठी युती केली, तेच नाही पडले” अशा आशयाचा बॅनर रांजणगाव मध्ये झळकत आहे.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

12 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

12 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

17 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago