मुख्य बातम्या

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच विरोधी उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आढळराव पाटील यांनी तिकिटासाठी शिवसेना (शिंदे गट) सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने सर्वसामान्य लोक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे शिरुर येथे आढळराव पाटील यांच्या विरोधात “शिरुर लोकसभेचा डमी उमेदवार, एक, दोन, तीन, चार ह्याला आम्ही पाडणार गद्दारांना गाडणार” असा मजकुर टाकत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 

सध्या शिरुर तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीकडुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडुन डॉ अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेले वीस वर्षे शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणुक लढवली होती. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच प्राबल्य असतानाही सर्वसामान्य जनतेने आढळराव यांना मताधिक्य देत लोकसभेत पाठवलं होत.

 

परंतु महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि सत्तेची समीकरण बदलल्यामुळे आढळराव पाटील यांनी आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तिकिटासाठी सोयीस्कर भुमिका घेत परत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला हि भुमिका पटली नाही. त्याचाच परिणाम म्हणुन एका लग्नात आढळराव पाटील यांच्या वतीने वधू-वराला शुभेच्छा देणाऱ्या शिरुर-आंबेगावच्या एका बड्या नेत्याची कट्टर शिवसैनिक असलेल्या आजोबांनी वऱ्हाडी मंडळी समोरच कानउघडणी केली होती.

 

त्यानंतर आता आढळराव पाटील यांच्या विरोधात शिरुर मध्ये बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळे शिरुरकर आढळराव यांच्यावर नाराज असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार शिरुर शहरात आढळराव यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी काही लोकांना पैसे देऊ केले होते. परंतु ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे दिल्याने रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केल्याचीही दबक्या आवाजात शिरुर शहरात चर्चा सुरु आहे.

ज्यांच्या विरोधात वीस वर्षे संघर्ष केला, त्यांच्याकडुनच उमेदवारी घेतल्याने आढळराव यांच्यावर मतदार नाराज…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

20 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

20 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

22 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

22 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago