शिरुर (तेजस फडके) ‘गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना आमच्या गावाला पाणी मिळण्यासाठी काय केलं याचं उत्तर द्या’ असं म्हणत पाबळ (ता. शिरुर) येथील अजित जाधव या युवकाने माजी खासदार आढळराव पाटील यांना भर चौकात चांगलच घेरलं.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पाबळ (ता. शिरुर) गावात प्रचारासाठी गेले असता त्यांना गावातील युवकांनी घेरलं आणि पाणी प्रश्नावर आढळरावांची बोलतीच बंद केली. शिरुरच्या पाबळ परिसरातील केंदूर, पाबळसह १३ गावांचा पाणी प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही नेत्याने त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे त्या भागातील संतप्त शेतकरी, युवक गेल्या चार वर्षांपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. आढळराव पाटील १५ वर्षे खासदार होते त्याचबरोबर मंत्री दिलीप वळसे पाटील देखील या भागाचं गेले अनेक वर्षे नेतृत्व करतात. मात्र या गावांना सातत्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने आढळराव पाटील यांना पाबळ गावात प्रचाराला आल्यानंतर भर चौकात जाब विचारला.
आम्ही तुम्हाला गेली १५ वर्षे मतदान केलं, एवढंच नाही तर वळसे पाटलांना देखील आम्ही छातीठोकपणे मतदान देतो परंतु तुम्ही लोकांनी आमच्या या गावांच्या पाण्यासाठी नेमकं काय केलं…? कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही निवडणूक लढत आहात…? असा सवाल अजित जाधव या युवकाने आढळराव पाटलांना केला. त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आढळरावांची या युवकाने बोलती बंद केली. शेजारी उभे असलेले वळसे पाटलांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील हे देखील त्या युवकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागले परंतु, त्यांनाही प्रतिप्रश्न करत वळसे पाटलांना देखील छातीठोकपणे आम्ही मतदान केलंय असं म्हणत प्रदीप वळसे पाटील यांनाही त्या युवकाने निरुत्तर केलं.
आढळराव पाटील आणि वळसे पाटील या दोघांनाही आम्ही मतदान दिलं. पण या दोघांनी पण आम्हाला पाण्यासाठी आजपर्यंत फसवलं असल्याचे भर चौकात आढळराव पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना त्या युवकाने सुनावले. या दोघांच्या बाजूला भाजपचे स्थानिक पदाधिकारी भगवान शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रकाश पवार हा घडत असलेला प्रकार निमूटपणे पाहत होते.
शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई
शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…
एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची…
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…