मुख्य बातम्या

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल (दि 25) रोजी शिरुरच्या पुर्वभागात डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा होता. त्यावेळी शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात कोल्हे यांनी जाण टाळल त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत डॉ कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? असा सवाल उपस्थित केला आहे.

 

मागील लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदार संघात दौरा करत पुर्व भागातील सर्व गावात भेट दिली होती. त्यानंतर डॉ अमोल कोल्हे यांनी पाच वर्षे काही गावांचा अपवाद वागळता परत एकाही गावात परत पाय ठेवला नाही किंवा खासदार निधीतुन एकही विकासकाम केलं नाही. त्यामुळे कोल्हे यांनी सर्वसामान्य लोकांचा भ्रमनिरास केला. तसेच डॉ अमोल कोल्हे हे अभिनेते असल्यामुळे लोक त्यांना मतदार संघात येण्यासाठी वेळच नसतो. त्यामुळे मतदार आधीच कोल्हे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.

 

परंतु काल (दि 25) रोजी पुर्वभागात डॉ कोल्हे यांचा नियोजित दौरा असतानाही शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात डॉ कोल्हे यांनी जाण्याचं टाळलं. त्यामुळे या तीनही गावांच्या ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली असुन डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यात या तीन गावातील मतदारांची नाराजी डॉ कोल्हे यांना भोवणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरुर तालुक्यात पाच वर्षात ना खासदार अमोल कोल्हे गावात आले ना त्यांचा खासदार निधी आला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

11 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

11 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

15 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

15 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

15 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

15 तास ago