मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात शेजाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस पेटून ५० हजार रुपयांचे नुकसान

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुमन पंढरीनाथ काळे (वय ५६, रा. फाकटे, ता. शिरूर) यांनी दिलेल्या माहितीवरून, (दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या शेतात (गट नंबर ९२/११) ऊसाला पाणी देत असताना त्यांना शेजारील शेतात धुर दिसल्याने त्या घटनास्थळी गेल्या. तेथे आरोपी बाळासाहेब हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन यांनी त्यांच्या शेतातील उसाचे पाचट जाळले होते. यामुळे त्यांच्या (फिर्यादीच्या) शेतात (गट नंबर ९३/१३) लागलेल्या एक एकर लहान ऊस पिकाला आग लागली. यासोबतच पाण्याची पाइपलाइनही आगीत जळाली.

घटनास्थळी योगेश शिंदे, महादू शिंदे, आणि संदीप हुंडारे हे साक्षीदार उपस्थित होते. फिर्यादीच्या मते, आरोपींना आग लागल्यास शेजारील ऊसाला आणि मालमत्तेला धोका होऊ शकतो याची पूर्ण जाणीव होती, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक पाचट पेटवून दिले. परिणामी फिर्यादीचे सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हवा आगलावे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

6 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

6 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

6 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

7 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

8 तास ago