आरोग्य

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत ‘हा’ पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत नाही. त्यामुळे कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागत आहे हा त्रास टाळण्यासाठी एक खास पदार्थ रोज घरातल्या सगळ्यांनीच खायला पाहिजे अगदी लहान मुलांनीही तो खायला पाहिजे.

सांधेदुखी, हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी उपाय

हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातला सगळ्यात उत्तम पदार्थ म्हणजे तीळ. त्यामुळे फक्त संक्रांतीच्या काळातच नाही तर रोजच साधारण १ चमचा तीळ तरी आपण नियमितपणे खायलाच पाहिजेत.

तिळांमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. पण त्यासोबतच फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम हे पदार्थही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे हाडं अधिक बळकट होण्यास मदत होते.

तीळ खाण्याची योग्य पद्धत

१) तीळ थोडेसे भाजून एका बरणीत ठेवा आणि दररोज सकाळी एक चमचा खा.

२) जर तुम्हाला नुसतेच भाजलेले तीळ खायला आवडत नसेल तर लसूण, लाल तिखट, जिरे घालून तिळाची खमंग चटणी करा आणि ही १ चमचा चटणी दररोज जेवणात तोंडी लावा.

३) जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असेल तर तीळ आणि गूळ घालून तिळाचे लाडू तयार करा किंवा चिक्की तयार करा आणि दररोज ती थोडी थोडी खा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago