मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात उसतोड कामगार न देता केली आर्थिक फसवणुक…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दत्तात्रय किसन गायकवाड रा. मलठण यांना गणेश बन्सी राठोड, लहु बढी चव्हाण यांनी त्यांना खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१,६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून कामगार न देता मोठी आर्थिक फसवणुक केली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जानेवारी २०२१ पासून आरोपी १) गणेश बन्सी राठोड, रा. तुपेवाडी तांडा, पो.बावणे पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना. २) लहु बढी चव्हाण, रा. तुपेवाडी तांडा, पो.बावणे पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना. यांनी आम्ही तुम्हाला खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा दत्तात्रय गायकवाड यांना विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१, ६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून त्यांना उसतोड कामगार न पुरविता व त्यांच्याकडून घेतलेली रक्कम आज रोजी पर्यंत परत न देता विश्वासघाताने त्यांची ३१,६०,०००/ रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढया रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

7 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

8 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

8 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

8 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

9 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

9 तास ago