मुख्य बातम्या

पोलिस कर्मचारी आत्महत्या प्रकरणी आरोपिंच्या पोलिस कोठडीत वाढ

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी, सासरा आणि मेहुणा जबाबदार असल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे यांची बहीण मनिषा इथापे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये दिली असल्याने पोलिसांनी या तिघांना अटक केली होती.

पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे हे पुणे ग्रामीण पोलिस दलात शिक्रापूर येथे नेमणूकीस होते. परंतु जितेंद्र यांचा शारीरिक व मानसिक छळ करुन त्यांना गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या पत्नीसह, सासरा व मेहुणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे या घटनेचा पुढील तपास करत असुन या तिन्ही आरोपिंना(दि 21) मार्च रोजी अटक करुन त्यांना 22 तारखेला शिरुर न्यायालयात हजर केलं असता त्यांना (दि 24) मार्च पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना परत (दि 24) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना परत (दि 25) मार्च पर्यंत पोलिस कोठडी वाढविण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी विनोद शिंदे यांनी दिली.

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

12 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

12 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

12 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

12 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

13 तास ago