शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांचा इशारा
शिक्रापुर (शेरखान शेख) शिरुर तालुक्यातून जाणाऱ्या नव्याने बनवण्यात आलेल्या बेल्हा-जेजुरी रस्त्यावर अनेक अपघात होत असल्याने सदर रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची वारंवार विनंती करुन सुद्धा प्रशासन दखल घेत नसून येत्या दहा दिवसात या रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी दिला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथून गेलेला बेल्हा-जेजुरी महामार्ग नव्याने झालेला असल्याने सदर रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असुन या रस्त्याने अनेक वाहने भरधाव वेगाने जात असतात मात्र या महामार्गाच्या कडेला जातेगाव बुद्रुक, मुखई, धामारी, पाबळ हि गावे असून रस्त्यांच्या कडेलाच शाळा, महाविद्यालय, बाजार, बँका आहेत, बेल्हा जेजुरी महामार्गावर कुठेही गतिरोधक नसल्याने मुख्य गावांच्या ठिकाणी अनेक लहानमोठे अपघात होत आहेत. गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर अपघात होऊन दहा ते बारा जणांचा मृत्यू झालेला असून कित्येक नागरिकांना गंभीर दुखापती देखील झालेल्या आहेत. यापूर्वी शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महामार्ग विभाग यांच्याकडे तक्रारी करत सदर रस्त्यांवर गावांच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केलेली असताना काहीही उपाययोजना झालेली नसून संबंधित अधिकाऱ्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.
मात्र अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अपघातात अनेक स्थानिकांना जीव गमवावा लागत असल्याने भविष्यात रस्त्यांवरील शाळा, महाविद्यालयांना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असुन येथे प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी शंकर जांभळकर यांनी केली असून येत्या दहा दिवसात प्रशासनाने सदर रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे देखील शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले आहे.
मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या…
मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…
चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील…
नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि…
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…