मुख्य बातम्या

बेल्हा-जेजुरी रस्त्यावर गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन

शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांचा इशारा

शिक्रापुर (शेरखान शेख) शिरुर तालुक्यातून जाणाऱ्या नव्याने बनवण्यात आलेल्या बेल्हा-जेजुरी रस्त्यावर अनेक अपघात होत असल्याने सदर रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची वारंवार विनंती करुन सुद्धा प्रशासन दखल घेत नसून येत्या दहा दिवसात या रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी दिला आहे.

Ranjangaon marathon

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून गेलेला बेल्हा-जेजुरी महामार्ग नव्याने झालेला असल्याने सदर रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असुन या रस्त्याने अनेक वाहने भरधाव वेगाने जात असतात मात्र या महामार्गाच्या कडेला जातेगाव बुद्रुक, मुखई, धामारी, पाबळ हि गावे असून रस्त्यांच्या कडेलाच शाळा, महाविद्यालय, बाजार, बँका आहेत, बेल्हा जेजुरी महामार्गावर कुठेही गतिरोधक नसल्याने मुख्य गावांच्या ठिकाणी अनेक लहानमोठे अपघात होत आहेत. गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर अपघात होऊन दहा ते बारा जणांचा मृत्यू झालेला असून कित्येक नागरिकांना गंभीर दुखापती देखील झालेल्या आहेत. यापूर्वी शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महामार्ग विभाग यांच्याकडे तक्रारी करत सदर रस्त्यांवर गावांच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केलेली असताना काहीही उपाययोजना झालेली नसून संबंधित अधिकाऱ्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.

मात्र अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अपघातात अनेक स्थानिकांना जीव गमवावा लागत असल्याने भविष्यात रस्त्यांवरील शाळा, महाविद्यालयांना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असुन येथे प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी शंकर जांभळकर यांनी केली असून येत्या दहा दिवसात प्रशासनाने सदर रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे देखील शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

1 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

1 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

1 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago