मुख्य बातम्या

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर परवाना रद्द करावा. सर्व्हे नं १९४९ यामध्ये पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करुन मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु केला आहे. शिरुर शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणारी बाजार पेठेमध्ये बेकायदेशीर सर्व्हे नं. ३२१ मध्ये बांधकाम केले आहे.

अशा अनेक मुद्यांवर शिरुर नगरपरिषदेच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषण चालू केले आहे. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, फरीद सय्यद, साजदी शेख, हुसेन शाह, आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

12 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

14 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

20 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago