मुख्य बातम्या

जांबुत सहकारी सोसायटीचे संचालक नाथा जोरी यांचे संचालकपद बरखास्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जांबुत सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक नाथा देवराम जोरी यांचे पद बरखास्त झाले आहे. तसा आदेश, शिरुर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी (दि. १२) जानेवारी २०२३ रोजी दिला आहे.

या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, जांबुत सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली होती. त्यात नाथा जोरी हे संचालक म्हणून निवडून आलेले होते. परंतु त्यांना 6 अपत्ये असल्याची माहिती त्यांनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.

तक्रारदार संतोष मारुती जोरी यांनी याबाबत तक्रार करत पुरेसे पुरावे सहाय्यक निबंधक कार्यालयास सादर केले होते. त्यामुळे संबंधित विभागाने अनेकवेळा सुनावणीसाठी तारखा देऊनही वैद्यकीय कारणास्तव नाथा जोरी सतत अनुपस्थित राहिल्याने, नियमानुसार व सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर त्यांचे पद हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क (अ) पोटकलम १ (vii) नुसार बरखास्त करुन, पुढे कोणत्याही सहकारी संस्था किंवा समितीवर नाथा जोरी हे निवडून जाण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, नुकत्याच झालेल्या जांबुत ग्रामपंचायत निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावलेले नाथा जोरी यांची या निर्णयामुळे राजकीय विकेट पडल्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

2 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

2 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago