मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील सिंचन साहित्य चोरी प्रकरणाला नवे वळण; आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे तसेच रांजणगाव परिसरात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.

मात्र, काही दिवसांनंतर तक्रारदारांनाच संशयित व्यक्तींबाबत अंदाज आल्याचे समोर येताच या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असुन काही तक्रारदारांनी संगनमत करुन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरही मदत घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही निष्पाप तक्रारदारांना शांत राहावे लागल्याचीही माहिती समोर येत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यानंतरही तक्रार दाखल होऊन आठ दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने ठोस कारवाई का केली नाही…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासन व नागरिकांमधील समन्वयाचा अभाव स्पष्ट होत असल्याची टीकाही होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात आल्याचीही चर्चा असून, सुरुवातीला शेतकऱ्यांची बाजू मांडत बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र पुढे काही तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील हितसंबंध समोर आल्याने यातील काही तक्रारदारांनी माघार घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर विविध स्तरांतून टिकेची झोड उठू लागली आहे.

त्यामुळे उशिरा का होईना, पण या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती समोर आणून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधित आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

(क्रमश:)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

3 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

4 तास ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

4 तास ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

8 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

8 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

9 तास ago