शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील शेवगा शेतीचे यशस्वी उद्योजक बाळाराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातुन शेतकऱ्यांसाठी (दि 16) जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळाराजे ठेमेकर यांनी केले आहे. या शिबिरात देशी गाईच्या शेण गोमुत्रावर तयार होणाऱ्या बायोगॅसच्या साह्याने शेतमाल तयार करून महिला बचत गट आणि ॲपच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर बोडके यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच कमीत कमी भांडवलात शेळी पालन कसे करावे तसेच उत्तम नियोजन करुन हा व्यवसाय यशस्वी कसा करावा शेळी पालन साठी योग्य जात, शेळीला लागणारं खाद्य आणि पाणी, शेळीचे लसीकरण यावर सतीश रन्हेर हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतीत आर्थिक स्थिरता येण्यासाठी गावरान कोंबडीचे चिकन आणि गावरान अंडी यांचा व्यवसाय कसा करावा यावर युवा उद्योजक सौरभ तापकीर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शेवगा पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी औषधी पावडर पर्यंत सर्व प्रकारच्या उत्पादनाचे संपुर्ण मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शेवगा शेतीतील यशस्वी शेतकरी बाळराजे ठेमेकर हे देणार आहेत.
या भव्य प्रशिक्षण शिबिरात सेंद्रिय शेती, शेवगा शेती, शेळीपालन, गावरान कोंबडी पालन आणि अंडी विक्री तसेच त्याचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असुन या प्रशिक्षणाचे शुल्क 700 रुपये आहे. शिरुर तालुक्यातील करडे येथील बाळराजे कृषी उद्योग या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असुन यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा.
बाळराजे ठेमेकर 7350280522
महेंद्र खेरणार 9923937058
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…