मुख्य बातम्या

एक रुपयात पिक विमा शेतकऱ्यांच्या हितासाठी; आकाश वडघुले

शिरुर (तेजस फडके): निर्वी (ता. शिरुर) येथे आज (दि 22) रोजी शनिवार असल्याने हनुमान चालीसा व आरती कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग व भारतीय कृषी विमा कंपनी व एच डी एफ शी इर्बो कंपनी संयुक्त विद्यमाने पिक विमा जनजागृती अभियान, कॅम्प व पाठशालाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आकाश वडघुले यांनी फळपिक विमा व प्रधानमंत्री पिक विमा योजना याबाबत माहिती सांगताना एक रुपयात आज काही येत नसले तर एक रुपयात पिक विमा मात्र निघतो आणि पिकांना संरक्षण मिळते ही बाब नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताची सरकारने राबवविली आहे. तसेच निर्वी गावात 1275 खातेदार असून 50 टक्के खातेदारांनी म्हणजे जवळपास 608 खातेदारांनी पिक विमा उतरविला असुन हि बाब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत आकाश वडघुले यांनी व्यक्त केले. खरीप हंगामात मुग बाजरी तुर भुईमुग पिकाचा विमा फक्त 1 रुपयात असुन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सीएससी सेंटरवर जाऊन पिक विमा उतरविला जात असुन उर्वरित शेतकऱ्यांनी 31 जुलै अखेर पिक विमा उतरावा असे हि आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होणे कामी विनोद सोनवणे नंदकुमार सोनवणे मेजर व कृषी सहायक जयवंत भगत राजेश चौधरी आकाश वडघुले यांनी विशेष योगदान दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

3 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

3 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

3 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

4 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

9 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

9 तास ago