मुख्य बातम्या

शिरुर नगरपरिषद हद्दीत अनाधिकृत जीओचे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे अन्यथा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात फायबर प्रा.लि, या कंपनीला पोल उभारण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु सदर कंपनीने नगरपरिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थीचा भंग केला आहे.

शिरूर नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसेवा’ मंडळाच्या गाळ्यांसमोर सिमेंटच्या रस्त्यावरच बेकायदा पोल बसवण्यासाठी ब्रेकरच्या साहय्याने आत्ताच नव्याने करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता खोदून पोल उभे केलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्यावर पोल उभे केलेले आहेत. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक नगरपरिषद या सर्व गोष्टीवर मुद्दाम डोळेझाक करत आहे, असा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी केला आहे. तसेच रस्त्याच्या सामासिक अंतरामध्ये जीओचे पोल उभारल्यामुळे शहरामध्ये अपघात होऊ शकतो, असे पञ जिल्हाधिकारी, पुणे याना दिले आहे.

नगरपरिषदेने जीओ कंपनीला अटी व शर्थी घालून दिल्या होत्या पण त्या अटी व शर्थीचा भंग केला आहे. यामुळे नगरपरिषदेने उभारण्यात आलेल्या जीओ चे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे, नाही तर या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे, असे मनसेचे उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

17 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

21 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

21 तास ago