मुख्य बातम्या

घोडगंगावर विरोधकांचे आरोप चुकीचे:- अजित पवार

शिरुर (तेजस फडके): राजकारण हे स्वच्छ असावं. एकदा आर्थिक घडी विस्कटली तर ती व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागतो. घोडगंगा कारखान्यावर 400 कोटी कर्ज नाही. विरोधक खोटा प्रचार करत आहे .साखर कारखान्यांवर सर्व अधिकारी, सरकारचे लक्ष असते. यावर्षी खूप पाऊस पडल्याने ऊस तोडण्यासाठी अजून वाफसाआलेला नाही.साखर कारखान्यांना एक्सपोर्ट कोटा दिलेला आहे .त्यामुळे ठराविक कोट्यानेच साखर विकावी लागते.त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान होत आहे. ही कोटा पद्धत शेतकऱ्यांना हानिकारक आहे. उमेदवारीचे तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका. घोडगंगासाठी मतदान करताना अशोक पवारांवर विश्वास ठेवून संपूर्ण पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केले.

गुरवार (दि 3) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारसभेसाठी अजित पवार मांडवगण फ़राटा येथे आले होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,” शिरूरचा भाग महाराष्ट्रात एक नंबरचा बागायती भाग आहे. कारखान्यासमोर अडचणी असतील तर त्या दुर केल्या जातील. तीन वर्षे सेना भाजप सरकारने वीज खरेदी केली नाही. त्याचा कारखान्याला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही निर्यात बंदी आहे. हे धोरण घातक आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मोदी साहेबांना समजून सांगाव्यात. मोठ्या उद्योगपतीना सवलती देतात परंतु शेतकऱ्याना मदत केली जात नाही. मतदार राजाने सर्व पॅनेलला निवडून द्यावे असे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

6 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

13 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago