मुख्य बातम्या

घोडगंगावर विरोधकांचे आरोप चुकीचे:- अजित पवार

शिरुर (तेजस फडके): राजकारण हे स्वच्छ असावं. एकदा आर्थिक घडी विस्कटली तर ती व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागतो. घोडगंगा कारखान्यावर 400 कोटी कर्ज नाही. विरोधक खोटा प्रचार करत आहे .साखर कारखान्यांवर सर्व अधिकारी, सरकारचे लक्ष असते. यावर्षी खूप पाऊस पडल्याने ऊस तोडण्यासाठी अजून वाफसाआलेला नाही.साखर कारखान्यांना एक्सपोर्ट कोटा दिलेला आहे .त्यामुळे ठराविक कोट्यानेच साखर विकावी लागते.त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान होत आहे. ही कोटा पद्धत शेतकऱ्यांना हानिकारक आहे. उमेदवारीचे तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका. घोडगंगासाठी मतदान करताना अशोक पवारांवर विश्वास ठेवून संपूर्ण पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केले.

गुरवार (दि 3) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारसभेसाठी अजित पवार मांडवगण फ़राटा येथे आले होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,” शिरूरचा भाग महाराष्ट्रात एक नंबरचा बागायती भाग आहे. कारखान्यासमोर अडचणी असतील तर त्या दुर केल्या जातील. तीन वर्षे सेना भाजप सरकारने वीज खरेदी केली नाही. त्याचा कारखान्याला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही निर्यात बंदी आहे. हे धोरण घातक आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मोदी साहेबांना समजून सांगाव्यात. मोठ्या उद्योगपतीना सवलती देतात परंतु शेतकऱ्याना मदत केली जात नाही. मतदार राजाने सर्व पॅनेलला निवडून द्यावे असे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

2 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

4 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

20 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago