मुख्य बातम्या

घोडगंगावर विरोधकांचे आरोप चुकीचे:- अजित पवार

शिरुर (तेजस फडके): राजकारण हे स्वच्छ असावं. एकदा आर्थिक घडी विस्कटली तर ती व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागतो. घोडगंगा कारखान्यावर 400 कोटी कर्ज नाही. विरोधक खोटा प्रचार करत आहे .साखर कारखान्यांवर सर्व अधिकारी, सरकारचे लक्ष असते. यावर्षी खूप पाऊस पडल्याने ऊस तोडण्यासाठी अजून वाफसाआलेला नाही.साखर कारखान्यांना एक्सपोर्ट कोटा दिलेला आहे .त्यामुळे ठराविक कोट्यानेच साखर विकावी लागते.त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान होत आहे. ही कोटा पद्धत शेतकऱ्यांना हानिकारक आहे. उमेदवारीचे तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका. घोडगंगासाठी मतदान करताना अशोक पवारांवर विश्वास ठेवून संपूर्ण पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केले.

गुरवार (दि 3) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारसभेसाठी अजित पवार मांडवगण फ़राटा येथे आले होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,” शिरूरचा भाग महाराष्ट्रात एक नंबरचा बागायती भाग आहे. कारखान्यासमोर अडचणी असतील तर त्या दुर केल्या जातील. तीन वर्षे सेना भाजप सरकारने वीज खरेदी केली नाही. त्याचा कारखान्याला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही निर्यात बंदी आहे. हे धोरण घातक आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मोदी साहेबांना समजून सांगाव्यात. मोठ्या उद्योगपतीना सवलती देतात परंतु शेतकऱ्याना मदत केली जात नाही. मतदार राजाने सर्व पॅनेलला निवडून द्यावे असे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

1 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

1 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

15 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

22 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

22 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

22 तास ago