महाराष्ट्र

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक (Agristack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीची रक्कम DBT द्वारे खात्यात जमा केली जाईल.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत आणि सेवा सहकारी संस्थांमध्ये प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईलवर Reference ID सहित SMS पाठवण्यात येईल. हा संदेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी E-KYC करून आधार पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

शेतकरी महा-ई-सेवा केंद्र, CSC किंवा संबंधित बँकेत बायोमेट्रिकद्वारे, तसेच अधिकृत कर्जमाफी पोर्टलवर OTP द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास ऑनलाइन तक्रार नोंदवण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

शासनाने शेतकऱ्यांना आधार व बँक खात्याशी मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवण्याचे, DBT सुविधा सक्रिय असल्याची खात्री करण्याचे आणि Agristack नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी (चतुर्थ श्रेणी वगळून), शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

2 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

5 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

5 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

6 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

6 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

7 तास ago