रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-अहमदनगर हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असुन या रोडलगतच कोरेगाव भीमा, सणसवाडी ,शिक्रापूर MIDC , रांजणगाव MIDC ,सुपा MIDC या औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहने तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी बेकायदेशीर डिव्हायडर तोडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावर बेकायदेशीर वाहतूक पार्किंग तसेच पुणे-नगर महामार्गवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
तसेच रोजच होणाऱ्या या वाहतुक कोंडीमुळे दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.तसेच पुणे नगर महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा असून यावरून मराठवाडा, विदर्भ याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. यासाठी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले . या निवेदनामध्ये पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी अशी मागणी केली. तर जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाविषयी आपण लवकरात लवकर बैठक लावू असे आश्वासन नाथा शेवाळे यांना दिले.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…