मुख्य बातम्या

पुणे-नगर महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संयुक्त बैठक लावा; नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-अहमदनगर हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असुन या रोडलगतच कोरेगाव भीमा, सणसवाडी ,शिक्रापूर MIDC , रांजणगाव MIDC ,सुपा MIDC या औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहने तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी बेकायदेशीर डिव्हायडर तोडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावर बेकायदेशीर वाहतूक पार्किंग तसेच पुणे-नगर महामार्गवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

तसेच रोजच होणाऱ्या या वाहतुक कोंडीमुळे दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.तसेच पुणे नगर महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा असून यावरून मराठवाडा, विदर्भ याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. यासाठी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले . या निवेदनामध्ये पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी अशी मागणी केली. तर जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाविषयी आपण लवकरात लवकर बैठक लावू असे आश्वासन नाथा शेवाळे यांना दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

4 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

4 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

4 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

4 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

9 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

9 तास ago