औरंगाबाद: कन्नड तालुक्यात असलेल्या टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे याचे खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथील त्याच्या चुलत मावस बहिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. सदरील मुलगी वडिलांच्या मोबाइलवरून विशालसोबत बोलत असे. तसेच चॅटिंग करीत असे. याची कुणकुण लागल्याने सदरील मुलीचा भाऊ आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने त्याच्या वडिलांच्या मोबाइलवरुन सदरील मुलीच्या नावाने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मेसेज पाठवून विशाल यास चिंचोली शिवारात बोलावून घेतले.
त्यामुळे विशाल हा 2 मित्रांसह चिंचोली शिवारात गेला असता आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने रागाच्या भरात काही कळण्याच्या आत त्याच्या जवळील लाकडी दांड्याने चुलत मावस भाऊ विशालच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार वार केला. तसेच विशालच्या दंडावर, खांद्यावर, मांडीवर जबर मारहाण केली.
सोबतच्या मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्णा पवार याने त्यांना जुमानले नाही. दरम्यान लाकडी दांड्याचा खनाच्या भागाचा जोराचा फटका बसल्याने विशालच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली.
जखमी अवस्थेत त्यास त्याच्या घराजवळील मंदिराजवळ सोडण्यात आले. यानंतर विशाल घरी गेला व अंघोळीसाठी अंगावरील कपडे काढत असताना खाली कोसळला. त्यानंतर त्यास उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी मृत घोषित केले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…