मुख्य बातम्या

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी वेळोवेळी शिरुर शहरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला असुन शिरुर नगरपालिकेला “टाळे” ठोकण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनापासुन सदर व्यक्तींना परावृत्त करावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा असा आदेश, पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरूर नगरपरिषदेला दिला आहे.

 

शिरुर शहरातील नागरिकांना धोका व नुकसान होणाऱ्या गोष्टींविरुद्ध कायमच महिबुब सय्यद, अनिल बांडे, अविनाश घोगरे, रवी लेंडे यांनी आवाज उठवला आहे. तसेच त्यासाठी वेळोवेळी ते प्रशासनाला चुकीच्या गोष्टी लक्षात आणुन देत आंदोलनही करत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरुर शहरातील शिरुर परिवहन मंडळ यांनी शिरुर नगरपालिकेच्या मालकीची जमीन बळकवण्याचा केलेला प्रयत्न, शिरुर शहरातील अनधिकृत बांधकामे व पार्किंग सुविधा उपलब्ध नसणाऱ्या इमारती, तसेच रोडच्या शेजारील बेशिस्त वाहने पार्किंग व रोडवर असणाऱ्या खड्ड्यांबाबत निवेदन देत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन व वेळ प्रसंगी उपोषणही केले होते.

 

या धोक्याच्या घंटा नगरपालिका मुख्याधिकारी यांना दाखऊनही योग्य ती कारवाई होत नसल्याने व पदपथावरील jio कंपनीचे अनधिकृत खांब, चतुर्थ वार्षिक श्रेणीकर आकारणी मधील त्रुटी व शिरुर नगर प्रशासन यांचा अनागोंदी कारभाराबाबत दि. 4 सप्टेबर रोजी शिरूर नगर पालिकेला “टाळे ठोक” आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी पत्र दिले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने नगरपरिषद स्तरावर चौकशी करून नियमांनुसार योग्य कार्यवाही करावी व संबंधिताना अवगत करावे तसेच त्यांना “टाळे ठोक” आंदोलन करण्यापासुन परावृत्त करावे. तसेच केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला दिला आहे. आता शिरुर नगरपरीषद यावर काय कारवाई करते. याकडे शिरुर शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

9 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

16 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

16 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

16 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

17 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

17 तास ago