मुख्य बातम्या

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड करत असते. म्हणून वडाचे झाड हे जीवनात खूप महत्वाचे आहे.

कोरोना काळात तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे रामलिंग येथे शुक्रवार (दि 3) रोजी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे. वटपौर्णिमा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण पण आहे. परंतु सध्याचा काळात काही महिला भगिनी भावना जपण्यासाठी वडाच्या झाडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करतात परंतु वटपौर्णिमा साजरी करताना झाडे लावून साजरी केली. तर याचा सर्वांनाच फायदा सर्वांना होईल. प्रत्येक महिलेने दिवशी एक तरी वडाचे झाड लाऊन ते वाढवले पाहिजे. यामुळे धार्मिक रूढी जपत,वडाचे झाड लावत वटपौर्णिमा साजरी करावी असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. यावेळी सविता देशमाने,अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, पुनम औटी, ऋतुजा देशमाने, मिनल रेपाळे, साक्षी कर्डिले तसेच अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

6 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

12 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

12 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

12 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

12 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago