शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड करत असते. म्हणून वडाचे झाड हे जीवनात खूप महत्वाचे आहे.
कोरोना काळात तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे रामलिंग येथे शुक्रवार (दि 3) रोजी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे. वटपौर्णिमा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण पण आहे. परंतु सध्याचा काळात काही महिला भगिनी भावना जपण्यासाठी वडाच्या झाडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करतात परंतु वटपौर्णिमा साजरी करताना झाडे लावून साजरी केली. तर याचा सर्वांनाच फायदा सर्वांना होईल. प्रत्येक महिलेने दिवशी एक तरी वडाचे झाड लाऊन ते वाढवले पाहिजे. यामुळे धार्मिक रूढी जपत,वडाचे झाड लावत वटपौर्णिमा साजरी करावी असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. यावेळी सविता देशमाने,अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, पुनम औटी, ऋतुजा देशमाने, मिनल रेपाळे, साक्षी कर्डिले तसेच अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…