शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड करत असते. म्हणून वडाचे झाड हे जीवनात खूप महत्वाचे आहे.
कोरोना काळात तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे रामलिंग येथे शुक्रवार (दि 3) रोजी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे. वटपौर्णिमा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण पण आहे. परंतु सध्याचा काळात काही महिला भगिनी भावना जपण्यासाठी वडाच्या झाडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करतात परंतु वटपौर्णिमा साजरी करताना झाडे लावून साजरी केली. तर याचा सर्वांनाच फायदा सर्वांना होईल. प्रत्येक महिलेने दिवशी एक तरी वडाचे झाड लाऊन ते वाढवले पाहिजे. यामुळे धार्मिक रूढी जपत,वडाचे झाड लावत वटपौर्णिमा साजरी करावी असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. यावेळी सविता देशमाने,अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, पुनम औटी, ऋतुजा देशमाने, मिनल रेपाळे, साक्षी कर्डिले तसेच अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…