मुख्य बातम्या

शिक्रापुरात ग्रामपंचायतच्या निषेधार्थ समाज मंदिराला लागले अचानक टाळे…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिराजवळ समाज बांधवांसाठी सुरु असलेले स्वच्छता गृहाचे काम जवळील शिक्षण संस्थेच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतने बंद केल्याच्या निषेधार्थ समाज बांधवांनी समाज मंदिराच्या मुख्य गेट ला टाळे ठोकून ग्रामपंचायतचा निषेध नोंदविला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिर परिसरात स्वच्छता गृह बांधण्याची मागणी नागरिकांनी केलेली असताना ग्रामपंचायत च्या वतीने सदर ठिकाणी 15 वित्त आयोगाच्या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आलेली असताना समाज मंदिराचे शेजारी काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात जागा देण्यात आलेल्या शिक्षण संस्थेने ग्रामपंचायतला पत्र देऊन सदर काम बंद करण्याची विनंती केली.

ग्रामपंचायतने सदर काम बंद केले असल्याने अशोक सोनवणे, आनंदा सोनवणे, नथू सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, सुनील सोनवणे, निलेश सोनवणे, राहुल लोंढे, सुरेश भोसले, अनिल पवार, स्वाती सोनवणे, सोनाली सोनवणे, निर्मला सोनवणे, मंदा सोनवणे, कविता सोनवणे, अर्चना सोनवणे, श्वेता सोनवणे, राधा पवार यांसह आदींनी समाज मंदिराचे गेटला टाळे ठोकून ग्रामपंचायतच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान येथील शिक्षण संस्थेला काही वर्षांपुरती तात्पुरत्या स्वरुपात शाळेला जागा दिलेली असताना सध्या राजकीय बळाचा वापर करुन संस्था हलवली जात नसून समाज मंदिराच्या परिसरातील जागा बळकावण्याचा डाव शिक्षण संस्थेचा असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असून ग्रामपंचायतने तातडीने काम सुरु करुन पूर्ण करण्याची मागणी देखील येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सदर ठिकाणी सुरु असलेल्या कामाबाबत येथील शाळेने ग्रापंचायतला पत्र दिले असल्याने सरपंच यांच्या आदेशानुसार काम बंद करण्यात आलेले असून शिक्षण संस्था व ग्रामस्थ या दोन्ही बाजूचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पाठवून पुढील निर्णय घेऊ असे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

12 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

15 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

18 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

1 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

22 तास ago