मुख्य बातम्या

शिरुर; निमोणे येथील माजी सरपंच पांडुरंग दुर्गे यांचे निधन

न्हावरे (प्रतिनिधी) निमोणे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच पांडुरंग विठोबा दुर्गे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने निमोणे गावासह शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निमोणेचे ग्रामपंचायत सदस्य अतुल दुर्गे यांचे ते वडील होते.

पांडुरंग दुर्गे हे अत्यंत शांत, मनमिळाऊ, निष्ठावान आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांनी निमोणे गावचे सरपंच म्हणून काम करताना गावात आठवडा बाजार सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच निमोणे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून अनेक शेतकऱ्यांना कर्ज सहाय्य मिळवून दिले. गावात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सुरु करण्यासाठीही त्यांचे मोठे योगदान होते.

निमोणे गावातील मारुती मंदिर व खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे ते विश्वासू सहकारी होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चाकू व कटरचा धाक दाखवून अत्याचार झाल्याच्या…

11 तास ago

मुंबई मेट्रोत युवक काँग्रेसची NEET पेपरफुटीविरोधात जनजागृती मोहीम; भाजप सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी…

11 तास ago

MH-CET परीक्षेतील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; सचिन सावंत

मुंबई: देशभरात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेतही गंभीर गैरप्रकार झाल्याचा…

13 तास ago

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; दिल्ली दौऱ्यासाठी एअर इंडियाने प्रवास

मुंबई: पंतप्रधान यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली…

13 तास ago

कॉलेज-कोचिंग संगनमतावर कारवाईची मागणी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या…

13 तास ago

महागाई ही मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम; अतुल लोंढे

NEET विद्यार्थ्यांच्या मृत्यूंसाठी केंद्र जबाबदार  मुंबई: देशातील वाढती महागाई ही केवळ इराण युद्धामुळे नसून मोदी…

20 तास ago