पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुढील आदेशापर्यंत दोन्ही दिशांतील (पुणे–मुंबई व मुंबई–पुणे) वाहतूक बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पुण्याहून मुंबईकडे जाणारे काही पर्यायी मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोणताही प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’ दरम्यान काँक्रीटचा खांब कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने तेथील वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…
पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…
वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे.…
किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील अनावश्यक घटक…
आपल्या पायातील शिरा रक्त परत हृदयाकडे नेतात. कधी कधी या शिरांमधील झडपा नीट काम करत…
मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे…