Baburao Pacharne
शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेलीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (वय ७१) यांचे आज (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शिरूर तालुक्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मागील बाबूराव पाचर्णे अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने रुग्णशय्येवर पडून होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी कालच रुग्णालयात जाऊन बाबूराव पाचर्णे यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तब्बल सहा विधानसभा निवडणुका पाचर्णे लढले. यशापयशाची तमा न बाळगता त्यांनी तालुक्याच्या राजकारणातील संघर्ष जिवंत ठेवला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गुडबुकमधील राजकारणी म्हणून पाचर्णे यांचा लौकिक होता. जात, धर्म, गरीब-श्रीमंत अगदी राजकीय विचारधारा याच्यापलिकडे जाऊन माणसाला आपलेसे करणारे पाचर्णे यांचे नेतृत्व आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिले.
राजकारणावर प्रस्थापितांच्या अभेद्य गडाला सुरुंग लावून पाचर्णे यांनी तालुक्याच्या राजकारणात स्वतः स्थान निर्माण केले. तर्डोबाचीवाडी यासारख्या एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबूराव पाचर्णे यांनी तालुक्याच्या राजकीय पटावर स्वतःची मोहोर उमटवताना सातत्याने संघर्षाचा रस्ता निवडला. गावचे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, साखर कारखाना आमदारकी या सगळ्या ठिकाणी पाचर्णे यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण केले होते.
शिरूर तालुक्यातील विवाह सोहळा, दशक्रिया विधींना ते आवर्जुन उपस्थित राहात होते. सर्वसामान्य नागिरकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान, बाबूराव पाचर्णे यांच्या पार्थीवावर आज सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी (शिरुर) येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार…
नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत…
जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून…
मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे…