dimbe dam
घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी…
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे.
दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली. तर घोडनदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन ही चिखले यांनी केले आहे.
दरम्यान, येथून पुढे पाऊसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून घोड नदी पात्रात केव्हाही जादा पाणी सोडण्यात येईल. नदीकाठाच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन ही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, टाकळी हाजी, फाकटे, पिंपरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी नदीत असणाऱ्या विद्युत मोटारी व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांकडून मिळत आहे.
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…