न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करुन त्यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवार (दि 15) रोजी सकाळी घडली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरुर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे. दशरथ यशवंत राऊत (वय 84, रा. बाभुळसर बुद्रुक, ता. शिरुर, जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय 26) या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत दशरथ राऊत यांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास दशरथ राऊत हे नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना देत असताना सोमनाथ संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्यावर व शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध आजोबांचा स्वतःच्या नातवाकडून झालेला खून समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे बाभुळसर बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरु केला. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…