शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी (दि. १७) पहाटे मालवाहू ट्रकला टेम्पोने जोरदार दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर ता.पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय 3८), शांताबाई मकाजी वाजे (वय ६८) व मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर वाजे हे आई व लहान मुलासह मुंबईहून दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गावाकडे येत होते. कवठे येमाई येथील काळूबाई नगरजवळील बंटी हॉटेलजवळ मालवाहू ट्रकवर (क्र. एम एच ४२ बी ८८६६) दुध वाहतूक करणारा टँकर (क्रमांक एम एच १६ सीडी ९८१९ ) जोरदार आदळला. धडक एवढी भीषण होती की टँकर ट्रकमध्ये घुसला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. मात्र लहानगा युवांश जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी शांताबाई व ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात वाजे कुटुंबातील तीन जणांचा करुण अंत झाल्याने वडनेर गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला आहे. अष्टविनायक महामार्ग सततच्या अपघातांमुळे ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असून धोकादायक वळणांवर चेतावणी फलक व शास्त्रीय गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…