मुख्य बातम्या

मयत व्यक्तीला अपत्य नसल्याचे कळताच महाराजांनी नाकारले मानधन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांनी ‘मी ही त्यांच्या मुलाप्रमाणेच आहे असं समजा असं म्हणतं’ प्रवचनाच मानधन त्या कुटुंबाला परत करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

कारेगाव येथे शामराव मल्हारी शितोळे यांचं दहा दिवसांपुर्वी निधन झालं होत. त्यांच्या दशक्रिया विधिला शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांचं प्रवचन होत. प्रवचन झाल्यानंतर शामराव शितोळे यांना अपत्य नसल्याचे फरताळे महाराजांच्या लक्षात आले. त्यावेळेस ऐन दिवाळीत शितोळे यांच्या पत्नीला झालेलं दुःख पाहून फरताळे महाराजांनी प्रवचनाच ‘मानधन’ नाकारत ते मानधन शितोळे यांच्या पुतण्याकडे परत दिलं. विशेष म्हणजे कारेगावच्या ग्रामस्थांनी यावेळी चहा पिण्याचा आग्रह केला. त्यालाही फरताळे महाराजांनी नम्रपणे नकार दिला. यावेळी दशक्रिया विधीसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसह कारेगाव ग्रामस्थांनीही या गोष्टीचे कौतुक केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

8 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

15 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

15 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

15 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

15 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

15 तास ago