मुख्य बातम्या

वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

वाघोली: वाघोली येथील एका व्यक्तीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर तलाठी कार्यालयातील मदतनीस आणि एका अन्य व्यक्तीने तलाठी यांच्याकडून काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी वाघोली येथील तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. तलाठी यांचे मदतनीस भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तलाठी यांच्याकडून काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता जागेची नोंद सात बाऱ्यावर घेण्यासाठी गिरी यांनी तलाठी पतंगे यांच्यासाठी ४५ हजार रुपये व त्यांच्या स्वतःसाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यास लगड यांनी सहाय्य केले म्हणून दोघांवर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली येथील तलाठ्याच्या नावे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली असुन भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. आव्हाळवाडी) आणि संजय मारूती लगड (वय ५३, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे असुन लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

3 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

5 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

10 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

10 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

10 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

10 तास ago