रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात यंदा निवडणूक नाही, तर थेट बंड उसळले आहे. वर्षानुवर्षे पैसा, सत्ता आणि राजकीय मसल पॉवरच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांसमोर आता सर्वसामान्य कार्यकर्ते छातीठोकपणे उभे ठाकले आहेत. आणि म्हणूनच हा गण संपूर्ण तालुक्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
कारेगाव पंचायत समिती गणातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय ऊर्फ कुमार नाणेकर हे ‘तुतारी’ हाती घेत रणशिंग फुंकत मैदानात उतरले आहेत. तर रांजणगाव पंचायत समिती गणातुन संदीप सोनवणे हे कोणाच्याही दबावाला न झुकता अपक्ष म्हणून थेट लढतीत उतरले आहेत. विशेष म्हणजे या दोघांची एकच ओळख आहे ती म्हणजे सामान्य माणसाचा आवाज
या दोन्ही गणांत तिरंगी किंवा चौरंगी लढत अपेक्षित असली, तरीही जमिनीवरचं वास्तव मात्र वेगळंच चित्र दाखवत आहे. मोठे बॅनर्स, आलिशान गाड्यांचे ताफे आणि पैशांचा पाऊस असूनही ‘जनता मात्र दुर जातेय आणि सामान्य उमेदवारांकडे झुकतेय’ अशी कुजबुज आता उघडपणे या दोन्ही पंचायत समिती गणात ऐकू येऊ लागली आहे.
त्यामुळे वाडी-वस्तीवर, गावोगावी आणि चहाच्या टपरीपासून ते शेताच्या बांधावर एकच चर्चा आहे “यावेळी चिन्ह नको, काम करणारा माणूस हवा!” आणि “पैशाने नाही, तर कामाने मत मिळेल!” नाणेकर आणि सोनवणे यांचा प्रचार म्हणजे ‘जाहिरातबाजी नाही, तर थेट संवाद, थेट प्रश्न आणि थेट भूमिका’ त्यामुळेच पारंपरिक राजकीय समीकरणे कोलमडताना दिसत असून, सत्ताधारी गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, आतापर्यंत ‘ठरलेले निकाल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणात आता निकाल मतदार ठरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेवटच्या टप्प्यातील हालचाली पाहता, अमाप पैसा ओतूनही वातावरण फिरत नसल्याने काही गोटांत घबराट स्पष्ट दिसतेय.
एकूणच, कारेगाव–रांजणगाव पंचायत समिती गणात यंदाची लढत म्हणजे सत्ता विरुद्ध सत्य आणि धनदांडगे विरुद्ध सामान्य जनता तसेच राजकारण विरुद्ध जनकारण अशीच आहे. त्यामुळे आता निकाल काहीही लागो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे कि या निवडणुकीने अनेकांची राजकीय गणिते बिघडवली आहेत आणि हाच गण शिरूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकतो.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…