मुख्य बातम्या

कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात नाणेकर-सोनवणे यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडणार…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात यंदा निवडणूक नाही, तर थेट बंड उसळले आहे. वर्षानुवर्षे पैसा, सत्ता आणि राजकीय मसल पॉवरच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांसमोर आता सर्वसामान्य कार्यकर्ते छातीठोकपणे उभे ठाकले आहेत. आणि म्हणूनच हा गण संपूर्ण तालुक्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

कारेगाव पंचायत समिती गणातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय ऊर्फ कुमार नाणेकर हे ‘तुतारी’ हाती घेत रणशिंग फुंकत मैदानात उतरले आहेत. तर रांजणगाव पंचायत समिती गणातुन संदीप सोनवणे हे कोणाच्याही दबावाला न झुकता अपक्ष म्हणून थेट लढतीत उतरले आहेत. विशेष म्हणजे या दोघांची एकच ओळख आहे ती म्हणजे सामान्य माणसाचा आवाज

या दोन्ही गणांत तिरंगी किंवा चौरंगी लढत अपेक्षित असली, तरीही जमिनीवरचं वास्तव मात्र वेगळंच चित्र दाखवत आहे. मोठे बॅनर्स, आलिशान गाड्यांचे ताफे आणि पैशांचा पाऊस असूनही ‘जनता मात्र दुर जातेय आणि सामान्य उमेदवारांकडे झुकतेय’ अशी कुजबुज आता उघडपणे या दोन्ही पंचायत समिती गणात ऐकू येऊ लागली आहे.

त्यामुळे वाडी-वस्तीवर, गावोगावी आणि चहाच्या टपरीपासून ते शेताच्या बांधावर एकच चर्चा आहे “यावेळी चिन्ह नको, काम करणारा माणूस हवा!” आणि “पैशाने नाही, तर कामाने मत मिळेल!” नाणेकर आणि सोनवणे यांचा प्रचार म्हणजे ‘जाहिरातबाजी नाही, तर थेट संवाद, थेट प्रश्न आणि थेट भूमिका’ त्यामुळेच पारंपरिक राजकीय समीकरणे कोलमडताना दिसत असून, सत्ताधारी गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत ‘ठरलेले निकाल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणात आता निकाल मतदार ठरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेवटच्या टप्प्यातील हालचाली पाहता, अमाप पैसा ओतूनही वातावरण फिरत नसल्याने काही गोटांत घबराट स्पष्ट दिसतेय.

एकूणच, कारेगाव–रांजणगाव पंचायत समिती गणात यंदाची लढत म्हणजे सत्ता विरुद्ध सत्य आणि धनदांडगे विरुद्ध सामान्य जनता तसेच राजकारण विरुद्ध जनकारण अशीच आहे. त्यामुळे आता निकाल काहीही लागो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे कि या निवडणुकीने अनेकांची राजकीय गणिते बिघडवली आहेत आणि हाच गण शिरूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

1 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

4 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago